Skip to main content

Posts

Showing posts from November, 2019

देशात कर्करोगाचे रुग्ण तब्बल ३०० टक्क्यांनी वाढले

जगभरात कर्करोगाच्या रुग्णांत वेगाने वाढ होत आहे. दर वर्षी जवळपास दोन कोटी लोकांना कर्करोगाची लागण होत असल्याची माहिती समोर आली आहे. २०१७ ते २०१८ या एका वर्षात कर्करोगाचे रुग्ण ३०० टक्क्यांनी वाढले आहेत. जगभरात कर्करोगाच्या रुग्णांत वेगाने वाढ होत आहे. दर वर्षी जवळपास दोन कोटी लोकांना कर्करोगाची लागण होत असल्याची माहिती समोर आली आहे. २०१७ ते २०१८ या एका वर्षात कर्करोगाचे रुग्ण ३०० टक्क्यांनी वाढले आहेत. सर्वसामान्य कर्करोगासह तोंडाचा कर्करोग, छातीचा कर्करोग या कर्करोगाचा यात समावेश आहे. भारतात कर्करोगाच्या रुग्णात वेगाने वाढ होत आहे. याबाबतची आकडेवारी 'राष्ट्रीय आरोग्य २०१९'च्या अहवालावरून समोर आली आहे. भारतात ३०० टक्क्यांनी वाढ झालेल्या कर्करोगाच्या रुग्णांच्या माहितीची राज्यातील एनसीडी (नॉन कम्युनिकेबल डिसीज) क्लिनिक्समध्ये नोंद करण्यात आलेली आहे. २०१८मध्ये ६.५ कोटी पेशंट या क्लिनिकमध्ये पोहोचले होते. यातील १.६ लाख लोकांना कर्करोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे, तर २०१७ मध्ये या केसमध्ये ३९ हजार ६३५ केसची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, एनसीडी क्लिनिकमध्ये २०१७ ते २०१८ पर्...

100 रुपये वाचवून अशी करा मोठी कमाई, महागाईची दूर होईल चिंता

100 रुपये वाचवून अशी करा मोठी कमाई, महागाईची दूर होईल चिंता: या महागाईच्या दिवसांत प्रत्येकालाच स्वत:चं भवितव्य सुरक्षित करायचं असतं. यासाठीच बचतीचे वेगवेगळे मार्ग आहेत.तुम्ही रोज जर 100 रुपयांची बचत केली तर मोठ्या रकमेची बचत होऊ शकते. दिसायला दिवसाला 100 रुपये दिसत असले तरी त्याचा फायदा कित्येक पटीने होऊ शकतो. SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात करा गुंतवणूक घटत्या व्याजदरांच्या या दिवसांत FD च्या ऐवजी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं हा चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली तर चांगला फायदा मिळू शकतो. त्यासाठी तुम्ही म्युच्युअल फंडात SIP च्या माध्यमातून रोज 100 रुपयांच्या हिशोबाने दरमहा 3 हजार रुपये जमा होऊ शकतात. 25 वर्षांत 9 लाखांची गुंतवणूक SIP कॅल्क्युलेटरच्या हिशोबाने तुम्ही जर 25 वर्षांसाठी गुंतवणूक करत राहिलात आणि 15 टक्के रिटर्न्सची अपेक्षा करत असाल तर त्याचा मोठा फायदा होईल. दरमहा 3 हजार रुपये या न्यायाने तुम्ही एकूण 9 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकाल. 25 वर्षांत 15 टक्के रिटर्न्सचा हिशोब केला तर गुंतवलेल्या रकमेवर तुम्हाला 98. 5 लाख रुपये मिळतील. यातले 8...

आणीबाणीच्या प्रसंगीही म्युच्युअल फंड उपयुक्त

कुटुंबाचे आर्थिक नियोजन करताना आपत्कालीन निधीचाही विचार करावा लागतो. कुटुंबाचे आर्थिक नियोजन करताना आपत्कालीन निधीचाही विचार करावा लागतो. गुंतवणूकदारांनी तीन ते सहा महिन्यांचा सरासरी मासिक खर्च हा आपत्कालीन निधी म्हणून राखीव ठेवावा, असा सल्ला अर्थनियोजक नेहमी देतात. विशेष म्हणजे, हा निधी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून उभारणे शक्य आहे. l आपत्कालीन निधी उभारण्याची गरज काय? अनेक प्रसंगी तातडीच्या आर्थिक मदतीची गरज भासू शकते. नोकरी गमावणे, गंभीर आजारपण, मोठे वैद्यकीय खर्च, अचानक उद्भवलेला लांबचा प्रवास आदी कारणांसाठी आर्थिक तरतूद करावी लागते. नेहमीच्या बचतीवर ताण पडू नये म्हणून असे खर्च भागविण्यासाठी राखीव ठेवण्यात येणारी रक्कम म्हणजे आपत्कालीन निधी. असा निधी नेहमी उपलब्ध ठेवावा, असा सल्ला अर्थनियोजक देतात. l आपत्कालीन निधी कशाप्रकारे उपयुक्त ठरतो? आणीबाणीच्या प्रसंगी मोठा खर्च उद्भवल्यास आपण सहसा नातेवाईक अथवा मित्रमैत्रिणींकडून पैसे घेतो. मुदत ठेवी मोडून अथवा शेअर्स विकून पैसे उभारण्याचाही पर्याय असतो. मात्र योग्य नियोजन करून आपत्कालीन निधीची उभारणी केल्यास हे सर्व टाळता येते. या निधीमुळ...

आरोग्यविमा खरेदीत महिला सजग

कुटुंबाचे आर्थिक व्यवस्थापनात काहीशा मागे असलेल्या महिलावर्गाने विमा खरेदी करण्यामध्ये मात्र पुरुषांना मागे टाकल्याचे चित्र आहे. 'पॉलिसीबाजार डॉट कॉम'च्या अहवालानुसार वैयक्तिक आरोग्यविमा खरेदी करण्यात महिलांनी पुरुषांवर आघाडी घेतली आहे. अहवालानुसार आरोग्यविमा खरेदी करणाऱ्या महिलांचे प्रमाण आर्थिक वर्ष २०१७च्या ९ टक्क्यांवरून आर्थिक वर्ष २०१९मध्ये १९ टक्क्यांवर पोहोचले आहे.       कुटुंबाचे आर्थिक व्यवस्थापनात काहीशा मागे असलेल्या महिलावर्गाने विमा खरेदी करण्यामध्ये मात्र पुरुषांना मागे टाकल्याचे चित्र आहे. 'पॉलिसीबाजार डॉट कॉम'च्या अहवालानुसार वैयक्तिक  आरोग्यविमा  खरेदी करण्यात महिलांनी पुरुषांवर आघाडी घेतली आहे. अहवालानुसार आरोग्यविमा खरेदी करणाऱ्या महिलांचे प्रमाण आर्थिक वर्ष २०१७च्या ९ टक्क्यांवरून आर्थिक वर्ष २०१९मध्ये १९ टक्क्यांवर पोहोचले आहे. दहापैकी सहा महिला वैयक्तिक आरोग्यविमा खरेदी करीत असून, विम्याची रक्कम (सम इन्शुअर्ड) पाच लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असल्याचेही आढळून आले आहे. 'पॉलिसीबाजार डॉट कॉम'च्या सर्व्हेक्षणामध्ये पंधरा राज्यांतील १०,००० म...

अर्थव्यवस्थेच्या उसळीपुर्वीच शेअबाजाराची उत्तुंग झेप

स्थानिक आणि जागतिक घडामोडींमुळे भारतीय शेअरबाजार खूपच अस्थितरता अनुभवत आहे. अशा स्थितीत शेअरबाजारासाठी आगामी काही महिने परिस्थिती कशी असेल ? हा प्रश्न गुंतवणूकदारांसमोर आहे. सध्या जागतिक पातळीवरील वृध्दीचे संकेत आणि पीएमआय निर्देशांकातील काही अंशी स्थिरता यांची सरमिसळ झालेली आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे जगातील मोठ्या केंद्रीय बँका हे त्यांच्या ताळेबंदाचा आकार वाढवत चालल्या आहेत. सध्याच्या जागतिक वातावरणात विविध वस्तूंच्या विशेषत इंधनाचे अल्प दर आणि अत्यल्प पातळीवरील व्याजदर हे दोन घटक भारतासाठी अतिशय सकारात्मक आहेत. गेली काही वर्ष भारताचा विकास हा मंदावला असून त्याचमुळे भारतीय शेअरबाजाराने मोठ्या प्रमाणात अस्थिरता अनुभवली आहे. शेअरबाजार यातुन केव्हा उसळी घेईल, याचा अंदाज बांधणे अवघड असले तरी पुढील चार मुद्दांमुळे बाजार टप्याटप्प्यात पुढील काही तिमाहींमध्ये सावरत जाईल, असे वाटते. विविध उद्योगक्षेत्रात तयार झालेला लाभदायक पाया, क्षेत्रनिहाय उपाययोजनांच्या माध्यमातून सरकारकडून आव्हानांचा कसोशीने सामना, समाधानकारक मॉन्सुनमुळे ग्रामीण भागातून चांगल्या मागणीची वाढलेली शक्यता आणि सर्वात मह...

बाजार के बाहुबली; 1 लाख के बना दिए 1.40 करोड़, ये हैं 10 साल में 140 गुना तक रिटर्न देने वाले ब्लूचिप शेयर

दिग्गज निवेशक कहते हैं कि शेयर बाजार में अगर निवेश के लिए सही शेयरों का चुनाव कर लिया तो अमीर बनने से कोई नहीं रोक सकता. *बॉरेन बफे से लेकर राकेश झुनझुनवाला जैसे दिग्गज निवेशक हमेशा से यह कहते हैं कि शेयर बाजार ऐसी जगह है, जहां अगर आपने निवेश के लिए सही शेयरों का चुनाव कर लिया तो आपको अमीर बनने से कोई नहीं रोक सकता. लेकिन इसके लिए जरूरी है कि निवेशक पैसा लगाने के बाद धैर्य दिखाएं. अगर आप मजबूत कंपनियों के शेयरों का प्रदर्शन देखें तो दिग्गजों की यह बात सही भी साबित होती है. महज 10 साल का प्रदर्शन देखें तो ब्लूचिप क्टेगिरी में कम से कम 8 शेयर ऐसे हैं, जिन्होंने निवेशकों को 500 फीसदी से 14000 फीसदी तक रिटर्न दिया है. यानी निवेशकों को महज 10 साल में 140 गुना से ज्यादा रिटर्न मिला है. जिसका मतलब है कि 1 लाख का निवेश 1.40 करोड़ बन गया.* * बजाज फाइनेंस * 10 साल का रिटर्न: 14234.16% 10 साल में शेयर का भाव: 29 रुपये से बढ़कर 4161 रुपये बजाज फाइनेंस एक नॉन बैंकिंग फाइनेंशियल कंपनी है. कंपनी का कुल मार्केट कैपिटलाइजेशन 2,49,857.40 करोड़ है. बजाज फाइनेंस की देशभर में फ्रेंचाइजी सालाना ...

फंडामेंटल विश्लेषण

फंडामेंटल (मुळतत्वावर आधारीत) विश्लेषण म्हणजेच पारंपारीक बाबींचा विचार करुन व कोणत्याही प्रकारच्या स्पेक्युलेटिव्ह (भविष्यातील संभाव्य घटणांचा) विचार न करता केलेले विश्लेषण असे म्हणता येईल कारण हे दलाल स्ट्रिटवर होणा-या उलथापलथीशी संबधीत नसते व ते खालील तिन बाबींचाच विचार करुन केले जाते. १) अर्थव्यवस्था २) औद्योगीक वातावरण (उद्योग) ३) कंपनी मुळतत्वावर आधारीत विश्लेषण करताना वरील तिन्ही घटकांचा एकत्रीत पणे विचार करावा लागतो व वरीलपैकी कोणतीही एक बाब वगळून ते करता येत नाही. आता आपण ह्या तिन्ही बाबी काय आहेत हे पाहुया. अर्थव्यवस्थेचे विश्लेषण दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्यासाठी अशीच वेळ चांगली असते ज्या वेळी बाजारात मंदी असते कारण याच वेळी साऱ्या शेअर्स चे बाजारमूल्य कमी झालेले असते व एका गुंतवणूकदारास ते कमी किमतीत मिळतात, मात्र हि स्थिती अल्पमुदतीच्या गुंतवणूकीसाठी जोखमीची आहे. औद्योगीक जगताचे विश्लेषण प्रत्येक औद्यगीक क्षेत्र हे ४ प्रकारच्या अवस्थेतून संक्रमण करत असते. १) सुरुवातीचा उभारणीचा कालखंड २) विस्तारिकरण व व्यवसाय वृध्दीचा कालखंड ३) स्थैर्याचा कालखंड ४)...

ऑनलाइन व्यवहारातील सावधगिरी आवश्यक

2016 मध्ये झालेल्या नोटबंदी नंतर देशभरामध्ये डिजिटल व्यवहारांना मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. आज आपण दैनंदिन जीवनामध्ये सातत्याने फोन पे, गुगल पे, भीम व अन्य मोबाइल वॉलेटचा वापर दररोज करत असतो. त्याचबरोबर इंटरनेट बँकिंग चा विस्तार देखील वेगाने होत आहे. डिजिटल किंवा रोकड रहित व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी. हे आपणास माहित असणे आवश्यक आहे. अलीकडील काळामध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर सध्या व्हाट्सअप वर एक मॅसेज फिरत आहे. तुमच्या खात्यामध्ये 86xxxx इतकी रक्कम जमा झाली आहे. या पार्श्वभूमीवर आपण कोणती काळजी घेतली पाहिजे.  मोबाईल ॲप पाठी मागील पाच वर्षात जगामध्ये चटके काय सायबर गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने बनावट मोबाईल ॲप्लिकेशन चा वापर झाला आहे. या पार्श्वभूमीवर आपण कोणतेही मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करताना त्या ॲप्लिकेशनची सत्यता पडताळणे आवश्यक आहे. मोबाईल मध्ये आवश्यक नसलेले मोबाईल ॲप्लिकेशन डिलीट करणेदेखील फायद्याचे आहे. विमा पॉलिसी आजकाल अनेकांना भारतीय विमा नियामक प्राधिकरणाकडून ईमेल प्राप्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र हे ...

इंट्राडे ट्रेडिंग नियम (intraday trading rules in marathi)

राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना

अर्थव्यवस्थेत शेअर बाजाराचे महत्त्व मोठे आहे. उद्योगांना भांडवल उभारणी करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी व ती मोकळी करण्यासाठी शेअर बाजार सहाय्यभूत होतो. भारतात १८७५ मध्ये मुंबई शेअर बाजार सुरू झाला. १९९० पर्यंत देशात साधारण २३ शेअर बाजार कार्यरत होते. ते प्रामुख्याने क्षेत्रीय स्तरावर कार्यरत होते. या सर्व बाजारातील एकूण व्यवहारांपैकी सुमारे ८० टक्के व्यवहार मुंबई बाजारात होत असत आणि तो देशात सर्वांत मोठा बाजार होता. त्याला अन्य बाजारांची फारशी स्पर्धा नव्हती. मोजके आणि एकमेकांशी खूपच जवळीक असलेले व्यापारी तेथे ब्रोकर्स म्हणून काम करत. मुंबई, दिल्ली, कलकत्ता, अहमदाबाद आणि मद्रास या शेअर बाजाराच्या नियामक मंडळात ब्रोकर्सची संख्या अनुक्रमे ६७, ७१, ६८, ६३ आणि ६० टक्के इतकी होती. यावरून बाजारात ब्रोकर्सचा प्रभाव सहज लक्षात येईल. कार्यकारी संचालकावर ब्रोकर्सचा खूप दबाव राहत असे. बाजाराच्या कारभारात पारदर्शकता नव्हती. तंत्रज्ञानाचा वापर नव्हता. खरेदी-विक्रीचे व्यवहार बाजाराच्या हौद्यात ब्रोकर्सच्या आवाजी देवाणघेवाणीतून होत असत. काँट्रॅक्ट नोटवर व्यवहारांची वेळ नोंदलेली नसल...

मुंबई शेअरबाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअरबाजार (NSE)

 मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअरबाजार (NSE) हे भारतातील दोन प्रमुख शेअर बाजार असून जवळजवळ सर्वच  शेअर, रोखे किंवा कर्जरोखे यांचे व्यवहार या दोनपैकी कोणत्यातरी एका बाजारात होतात. हे दोन्ही बाजार मुंबईतच आहेत. यातील मुंबई शेअरबाजार हा आशियातील सर्वात जुना शेअरबाजार आहे, त्याची स्थापना 1875 साली झाली. तर राष्ट्रीय शेअरबाजाराची स्थापना 1992 साली झाली. सध्या दोन्ही शेअरबाजारात 100% व्यवहार संगणकामार्फत होतात. या दोन्ही बाजारातील साम्य आणि फरक खालीलप्रमाणे--   *मुंबई शेअर बाजारातील विविध क्षेत्रातील 30 प्रमुख कंपन्यांच्या व्यवहारास उपलब्ध समभागांच्या उलाढाल आणि बाजारमूल्य यावर आधारित निर्देशांक असून त्यास सेन्सेक्स असे म्हणतात तर अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअरबाजारातील 50 कंपन्या असलेल्या निर्देशांकास निफ्टी असे म्हणतात. *मुंबई शेअरबाजार हा जगातील सर्वात मोठा असा 10 वा शेअरबाजार असून राष्ट्रीय शेअरबाजार 11 व्या स्थानी आहे. *मुंबई शेअरबाजाराचे 30 नोव्हेंबर 2018 रोजीचे बाजारमूल्य 205600 अमेरिकन डॉलर होते तर राष्ट्रीय शेअरबाजाराचे त्याच दिवशीचे बाजारमूल्य 203000 को...

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगली कंपनी कशी निवडावी

 ज्या कंपनीचे उत्पादन सुरळीत चालू आहे दरवर्षी विक्रीचा आकडा मागच्या वर्षापेक्षा किमान दहा ते बारा टक्क्यांनी जास्त असावा  विक्रीवरील नफ्याचे प्रमाण मागच्या वर्षी पेक्षा जास्त असावे  उलाढालीच्या प्रमाणात गंगाजळी समाधानकारक असावी  सर्व देण्याचे आणी घेण्याचे व्यवहार मिटवता उलाढालीचा प्रमाणात कंपनीचे निव्वळ मूल्य समाधानकारक असावे कंपनीचे उत्पादन आधुनिक काळाशी सुसंगत असावे  उत्पादनासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला असावा व व उत्पादनात आणखी सुधारणा घडवून आणण्यासाठी जी कंपनी संशोधनावर पुरेसा खर्च करते अशी कंपनी निवडावी  कंपनीचे संचालक व व्यवस्थापक मंडळ निष्कलंक असावे कंपनीच्या हाती मोठ्या प्रमाणात पेंडिंग ऑर्डर्स असाव्यात त्याचबरोबर पेंटिंग ऑर्डर्स पूर्ण करण्याची कंपनीची क्षमता असावी कंपनीच्या भावी विस्ताराची दिशा आणि योजना तयार आहेत का हेदेखील बघणे आवश्यक आहे.  कंपनीचा कारभार किती वर्षापासून सुरू आहे कंपनी व संचालकांना गरज व्यवहाराबद्दल कधी दंड झाला आहे का  कंपनीचे कामगारांची संबंध सुरळीत आहेत का  कंपनी...

चांगले शेयर्स कसे निवडावे

चांगले समभाग शोधण्याची साधन  विविध गुणोत्तरे  (Financial Ratios) इफिशियन्सि रेशो : कार्यक्षमतेच्या या रेशोमुळे कंपनी आपली मालमत्ता , भागभांडवल , घेतलेली कर्जे यांचा पूर्ण क्षमतेने वापर करून किमान खर्चात कमाल उत्पादन करते का ?ते समजण्यासाठी मदत होते . १.वर्किंग कॅपिटल टर्नओवर रेशो :निव्वळ उलाढालिस वर्किंग कॅपिटल म्हणजेच चालू मालमत्तेमधून चालू देयता (liabilities) वजा करून आलेल्या संख्येने भागले तर हा रेशो मिळतो .हा रेशो जेवढा जास्त तेवढे चांगले . २.रिसिव्हेबल टर्नओवर :या मध्ये निव्वळ उलाढालिस येणे बाकी असलेल्या रकमेने भागले जाते .येणे रक्कम जेवढी कमी तितका भागाकार वाढेल .हा रेशो काळजीपूर्वक काढणे जरुरीचे आहे . ३.इनव्हेटरी टर्नओवर रेशो :उत्पादनातील कच्चा माल , अर्धवट प्रक्रिया झालेला माल आणि उत्पादित परंतु शिल्लक माल यास इनव्हेटरी असे म्हणतात त्यांस विक्री झालेल्या उत्पादित मालास आलेल्या खर्चाने हा रेशो मिळतो .हा रेशो खूपच फसवा असून इनव्हेटरी कमीत कमी असणे त्याचबरोबर उत्पादन खर्च कमी असणे हे चांगल्या कंपनीचे लक्षण आहे . ४.प्राईज अर्निग रेशो :PE या संक्षिप्त ...