Skip to main content

Posts

देशात कर्करोगाचे रुग्ण तब्बल ३०० टक्क्यांनी वाढले

जगभरात कर्करोगाच्या रुग्णांत वेगाने वाढ होत आहे. दर वर्षी जवळपास दोन कोटी लोकांना कर्करोगाची लागण होत असल्याची माहिती समोर आली आहे. २०१७ ते २०१८ या एका वर्षात कर्करोगाचे रुग्ण ३०० टक्क्यांनी वाढले आहेत. जगभरात कर्करोगाच्या रुग्णांत वेगाने वाढ होत आहे. दर वर्षी जवळपास दोन कोटी लोकांना कर्करोगाची लागण होत असल्याची माहिती समोर आली आहे. २०१७ ते २०१८ या एका वर्षात कर्करोगाचे रुग्ण ३०० टक्क्यांनी वाढले आहेत. सर्वसामान्य कर्करोगासह तोंडाचा कर्करोग, छातीचा कर्करोग या कर्करोगाचा यात समावेश आहे. भारतात कर्करोगाच्या रुग्णात वेगाने वाढ होत आहे. याबाबतची आकडेवारी 'राष्ट्रीय आरोग्य २०१९'च्या अहवालावरून समोर आली आहे. भारतात ३०० टक्क्यांनी वाढ झालेल्या कर्करोगाच्या रुग्णांच्या माहितीची राज्यातील एनसीडी (नॉन कम्युनिकेबल डिसीज) क्लिनिक्समध्ये नोंद करण्यात आलेली आहे. २०१८मध्ये ६.५ कोटी पेशंट या क्लिनिकमध्ये पोहोचले होते. यातील १.६ लाख लोकांना कर्करोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे, तर २०१७ मध्ये या केसमध्ये ३९ हजार ६३५ केसची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, एनसीडी क्लिनिकमध्ये २०१७ ते २०१८ पर्

100 रुपये वाचवून अशी करा मोठी कमाई, महागाईची दूर होईल चिंता

100 रुपये वाचवून अशी करा मोठी कमाई, महागाईची दूर होईल चिंता: या महागाईच्या दिवसांत प्रत्येकालाच स्वत:चं भवितव्य सुरक्षित करायचं असतं. यासाठीच बचतीचे वेगवेगळे मार्ग आहेत.तुम्ही रोज जर 100 रुपयांची बचत केली तर मोठ्या रकमेची बचत होऊ शकते. दिसायला दिवसाला 100 रुपये दिसत असले तरी त्याचा फायदा कित्येक पटीने होऊ शकतो. SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात करा गुंतवणूक घटत्या व्याजदरांच्या या दिवसांत FD च्या ऐवजी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं हा चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली तर चांगला फायदा मिळू शकतो. त्यासाठी तुम्ही म्युच्युअल फंडात SIP च्या माध्यमातून रोज 100 रुपयांच्या हिशोबाने दरमहा 3 हजार रुपये जमा होऊ शकतात. 25 वर्षांत 9 लाखांची गुंतवणूक SIP कॅल्क्युलेटरच्या हिशोबाने तुम्ही जर 25 वर्षांसाठी गुंतवणूक करत राहिलात आणि 15 टक्के रिटर्न्सची अपेक्षा करत असाल तर त्याचा मोठा फायदा होईल. दरमहा 3 हजार रुपये या न्यायाने तुम्ही एकूण 9 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकाल. 25 वर्षांत 15 टक्के रिटर्न्सचा हिशोब केला तर गुंतवलेल्या रकमेवर तुम्हाला 98. 5 लाख रुपये मिळतील. यातले 8

आणीबाणीच्या प्रसंगीही म्युच्युअल फंड उपयुक्त

कुटुंबाचे आर्थिक नियोजन करताना आपत्कालीन निधीचाही विचार करावा लागतो. कुटुंबाचे आर्थिक नियोजन करताना आपत्कालीन निधीचाही विचार करावा लागतो. गुंतवणूकदारांनी तीन ते सहा महिन्यांचा सरासरी मासिक खर्च हा आपत्कालीन निधी म्हणून राखीव ठेवावा, असा सल्ला अर्थनियोजक नेहमी देतात. विशेष म्हणजे, हा निधी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून उभारणे शक्य आहे. l आपत्कालीन निधी उभारण्याची गरज काय? अनेक प्रसंगी तातडीच्या आर्थिक मदतीची गरज भासू शकते. नोकरी गमावणे, गंभीर आजारपण, मोठे वैद्यकीय खर्च, अचानक उद्भवलेला लांबचा प्रवास आदी कारणांसाठी आर्थिक तरतूद करावी लागते. नेहमीच्या बचतीवर ताण पडू नये म्हणून असे खर्च भागविण्यासाठी राखीव ठेवण्यात येणारी रक्कम म्हणजे आपत्कालीन निधी. असा निधी नेहमी उपलब्ध ठेवावा, असा सल्ला अर्थनियोजक देतात. l आपत्कालीन निधी कशाप्रकारे उपयुक्त ठरतो? आणीबाणीच्या प्रसंगी मोठा खर्च उद्भवल्यास आपण सहसा नातेवाईक अथवा मित्रमैत्रिणींकडून पैसे घेतो. मुदत ठेवी मोडून अथवा शेअर्स विकून पैसे उभारण्याचाही पर्याय असतो. मात्र योग्य नियोजन करून आपत्कालीन निधीची उभारणी केल्यास हे सर्व टाळता येते. या निधीमुळ

आरोग्यविमा खरेदीत महिला सजग

कुटुंबाचे आर्थिक व्यवस्थापनात काहीशा मागे असलेल्या महिलावर्गाने विमा खरेदी करण्यामध्ये मात्र पुरुषांना मागे टाकल्याचे चित्र आहे. 'पॉलिसीबाजार डॉट कॉम'च्या अहवालानुसार वैयक्तिक आरोग्यविमा खरेदी करण्यात महिलांनी पुरुषांवर आघाडी घेतली आहे. अहवालानुसार आरोग्यविमा खरेदी करणाऱ्या महिलांचे प्रमाण आर्थिक वर्ष २०१७च्या ९ टक्क्यांवरून आर्थिक वर्ष २०१९मध्ये १९ टक्क्यांवर पोहोचले आहे.       कुटुंबाचे आर्थिक व्यवस्थापनात काहीशा मागे असलेल्या महिलावर्गाने विमा खरेदी करण्यामध्ये मात्र पुरुषांना मागे टाकल्याचे चित्र आहे. 'पॉलिसीबाजार डॉट कॉम'च्या अहवालानुसार वैयक्तिक  आरोग्यविमा  खरेदी करण्यात महिलांनी पुरुषांवर आघाडी घेतली आहे. अहवालानुसार आरोग्यविमा खरेदी करणाऱ्या महिलांचे प्रमाण आर्थिक वर्ष २०१७च्या ९ टक्क्यांवरून आर्थिक वर्ष २०१९मध्ये १९ टक्क्यांवर पोहोचले आहे. दहापैकी सहा महिला वैयक्तिक आरोग्यविमा खरेदी करीत असून, विम्याची रक्कम (सम इन्शुअर्ड) पाच लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असल्याचेही आढळून आले आहे. 'पॉलिसीबाजार डॉट कॉम'च्या सर्व्हेक्षणामध्ये पंधरा राज्यांतील १०,००० म

अर्थव्यवस्थेच्या उसळीपुर्वीच शेअबाजाराची उत्तुंग झेप

स्थानिक आणि जागतिक घडामोडींमुळे भारतीय शेअरबाजार खूपच अस्थितरता अनुभवत आहे. अशा स्थितीत शेअरबाजारासाठी आगामी काही महिने परिस्थिती कशी असेल ? हा प्रश्न गुंतवणूकदारांसमोर आहे. सध्या जागतिक पातळीवरील वृध्दीचे संकेत आणि पीएमआय निर्देशांकातील काही अंशी स्थिरता यांची सरमिसळ झालेली आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे जगातील मोठ्या केंद्रीय बँका हे त्यांच्या ताळेबंदाचा आकार वाढवत चालल्या आहेत. सध्याच्या जागतिक वातावरणात विविध वस्तूंच्या विशेषत इंधनाचे अल्प दर आणि अत्यल्प पातळीवरील व्याजदर हे दोन घटक भारतासाठी अतिशय सकारात्मक आहेत. गेली काही वर्ष भारताचा विकास हा मंदावला असून त्याचमुळे भारतीय शेअरबाजाराने मोठ्या प्रमाणात अस्थिरता अनुभवली आहे. शेअरबाजार यातुन केव्हा उसळी घेईल, याचा अंदाज बांधणे अवघड असले तरी पुढील चार मुद्दांमुळे बाजार टप्याटप्प्यात पुढील काही तिमाहींमध्ये सावरत जाईल, असे वाटते. विविध उद्योगक्षेत्रात तयार झालेला लाभदायक पाया, क्षेत्रनिहाय उपाययोजनांच्या माध्यमातून सरकारकडून आव्हानांचा कसोशीने सामना, समाधानकारक मॉन्सुनमुळे ग्रामीण भागातून चांगल्या मागणीची वाढलेली शक्यता आणि सर्वात मह