Skip to main content

Posts

स्टार्ट अर्ली, रिच सेफली

प्रवासात आपण "स्टार्ट अर्ली , रिच सेफली " हे वाक्य नेहमी वाचतो . अर्थात लवकर प्रवास सुरु करा म्हणजे वेग कमी असला तरी आपण वेळेत आणि  सुरक्षीतपणे योग्य ठिकाणी पोचतो. गुंतवुणकीचे सुद्धा तसेच असते. तरुण वयात लवकर गुंतवणूक सुरु करून आपण गुंतवणुकीचा कालावधी खूप मोठा ठेवून  संपत्ती उभी करू शकतो. शिवाय तरुण वयात गुंतवणूक करताना थोडी जोखीम घेतली तरी कालांतराने त्या जोखमीचे रूपांतर फायद्यात होते. तसेच गुंतवणुकीचा कालावधी खूप मोठा असल्यामुळे चक्रवाढ पद्धतीने परताव्याचा फायदा आश्‍चर्यकारक पद्धतीने वाढतो. अर्थात अशी गुंतवणूक सुरु करण्यापूर्वी त्या गुंतवणुकीतून किती परतावा मिळू शकतो, याचा अंदाज घ्यायला हवा. गेल्या अनेक वर्षांचा इतिहास पाहिल्यास म्युच्युअल फंड हा गुंतवणूक पर्याय दीर्घकाळात चांगला परतावा देण्याची क्षमता बाळगतो, हे सिद्ध झाले आहे. आजच्या भारतीय तरुणांच्या करियरचा विचार केल्यास साधारणतः 25 वर्षांपर्यंत शिक्षण संपून त्यांच्या नोकरी-व्यवसायाला सुरवात होते. अगदी त्याचवेळी म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरु करून पुढील 20 वर्षांचे नियोजन केल्यास वयाच्या 45 व्या वर्षी त्याच्

अर्थसाक्षर आणि अर्थसक्षम बना

                      आपल्या आर्थिक जीवन चक्रामध्ये अडचणी आणि संधी निर्माण होत असतात. यामध्ये आपण उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करतो. उत्पन्नातील काही रक्कम खर्च करतो आणि शिल्लक राहिलेली बचतीच्या स्वरूपात गुंतवणूक करीत असतो. वैयक्तिक आर्थिक नियोजनामध्ये वय वर्ष 30 ते 40 खूप महत्त्वाचे असते. या वयामध्ये बहुतेक लोक त्यांच्या वैयक्तिक नियोजनाच्या गोड स्थळी पोचलेले असतात. कारण आपल्याकडे अधिकतर मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये वयाच्या 25 ते 35 या दरम्यान नोकरी लागते  किंवा काही तर उद्योग धंदा सुरू केलेला असतो. सुरुवातीला इन्कम सुरू झाल्यानंतर आपण बचत न करता पैसा खर्च करीत असतो. अशा वेळी लोक बचत आणि गुंतवणुकीच्या योजने कडे दुर्लक्ष करतात. पैशाची गोष्ट अशी अवस्था आहे. जेथे चुका सुधारण्याची क्षमता कमी असते. कारण या चुका दुरुस्त करण्यासाठी खूप कमी वेळ उपलब्ध असतो. म्हणून आपले आर्थिक आरोग्य सुरक्षित ठेवण्याची आणि चांगल्या भविष्यासाठी मार्ग तयार करण्याची ही वेळ आहे. आपण आयुष्यातील आर्थिक चुका लवकर दुरुस्त करणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे सर्व भारतीय लोकांमध्ये अर्थसाक्षरतेचे प्रमाण खूप कमी आ

Here are the 10 biggest wealth creators between 2014-19

* Reliance Industries: *  It emerged as the biggest wealth creator during 2014-2019 after a gap of seven years. The Rs 5.6 lakh crore wealth created by Reliance is the highest ever so far by a huge margin, the study said. It has risen 252 percent in the last 5 years and 39 percent in the last 1 year. * HDFC Bank: * The lender added 4 lakh crore wealth during 2014-2019, which is equal to 8.3 percent of the total wealth created by the top 100 stocks. It has risen 174 percent in the last 5 years and 22 percent in the last 1 year. * TCS: * The stock has created Rs 3.6 lakh crore wealth between 2014-2019. Its current market capitalisation is at 8.2 lakh crore. The scrip has gained 74 percent in the last 5 years and 11 percent in the last 1 year. * Hindustan Unilever: * The FMCG company has created Rs 2.4 lakh crore wealth in the last 5 years, amounting to 4.9 percent of the total wealth created by the top 100 creators. HUL has risen 160 percent in

मराठी पाऊल आर्थिक सक्षमतेकडे: शेअर मार्केट जुगार आहे का?

चला आज यावर बोलुया. किती जणांना वाटतं की शेअर मार्केट हा जुगार आहे? मला पण सुरुवातीला वाटायचं की शेअर मार्केट हा जुगार आहे. मी ग्रामीण भागातील वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून अर्थशास्त्र हा विषय शिकवतो. अलीकडील काळात यूजीसीने धोरणात्मक बदल केले आहेत त्यामुळे त्यांनी सांगितले आहे की विद्यार्थ्यांना कौशल्यभिमुख शिक्षण देण्यात यावे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही महाविद्यालय मध्ये स्टॉक मार्केट अँड इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट हा कोर्स सुरू केला. या कोर्सला विद्यार्थ्यांचा खूप प्रतिसाद मिळाला. मात्र जास्त तर विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना हे सांगितले नाही की आम्ही स्टॉक मार्केट कोर्सला ऍडमिशन घेतले आहे. त्यांना भीती वाटते पालक रागावतील म्हणून . म्हणजे आज अशी परिस्थिती झाली आहे की ज्या शिक्षणातून  म्हणजेच पारंपारिक शिक्षणातून मला आयुष्यात कोणतेही कौशल्य मिळणार नाही ते शिक्षण देण्यास आमचे पालक तयार आहेत मात्र एखादं नवीन कौशल्य आत्मसात करायचे असते तेव्हा स्वतःच्या पाल्यांना परावृत्त करत आहेत हे खूप मोठे दुर्दैव आहे मराठी माणसाचे. आपण बऱ्याच वेळा वर्तमानपत्रांमध्ये आणि दूरदर्शन

सेन्सेक्सचा रेकॉर्ड; 'ही' आहेत तेजीमागील ४ कारणे

केंद्र सरकारचा आर्थिक सुधारणांचा धडाका, परकीय गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने आज मुंबई शेअर बाजारच्या सेन्सेक्सने तब्बल ४०० अंकांची झेप घेतली. बाजार बंद होताना सेन्सेक्स ४१३ अंकांच्या वाढीसह ४१ हजार ३५२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १११ अंकांच्या वाढीस १२ हजार १६५ अंकाच्या नव्या विक्रमाची नोंद केली. या तेजीच्या लाटेने गुंतवणूकदारांना किमान दीड लाख कोटींनी मालामाल केले. शेअर बाजाराच्या इतिहासातील सेन्सेक्स आणि निफ्टीचा आतापर्यंतचा रेकॉर्ड स्तर आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही नजीकच्या काळात व्याजदर कपातीचे संकेत दिले होते. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी बँक गरज पडेल तेव्हा हस्तक्षेप करेल,असे त्यांनी 'इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह'मध्ये उपस्थितांना आश्वस्त केले होते. अर्थमंत्री  निर्मला सीतारामन  यांनी या परिषदेला संबोधित करताना जीएसटी दरवाढीच्या शक्यता फेटाळून लावल्या. जीएसटी दरवाढीचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. वस्तूंचा खप वाढण्यासाठी सरकार पावले उचलत आहे. लोकांच्या हातातील पैसा वाढवा यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे स