Skip to main content

Posts

पैशाची गोष्ट : टर्म इन्शुरन्स म्हणजे काय आणि तो घेताना काय काळजी घ्यायची?

टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? "कुटुंबासाठीच्या आर्थिक नियोजनांतील विमा ही अतिशय महत्त्वाची व पहिली पायरी मानली जाते." आयुर्विम्याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे टर्म इन्शुरन्स आणि दुसरा कायमस्वरुपी विमा. पैकी टर्म इन्शुरन्समध्ये ठरलेल्या मुदतीपर्यंत तुम्हाला हप्ते भरायचे असतात. पैसे तुमच्या पश्चात तुमच्या नॉमिनीला मिळतात. थोडक्यात तुमच्या नंतर तुमच्यावर अवलंबून लोकांची आर्थिक काळजी घेणारा हा इन्शुरन्स आहे. पण, मुदतीनंतर तुम्ही जिवंत असाल तर मात्र तुम्हाला लाभ मिळत नाही. हाच इतर आयुर्विमा आणि टर्म इन्शुरन्सचा फरक आहे.  टर्म  इन्शुरन्सची गरज  काय? इन्शुरन्स तज्ज्ञ मिलिंद बने यांच्या मते, टर्म इन्शुरन्स हे एकच माध्यम आहे जे आपल्या सर्व आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करू शकतं."घरातली कर्ती व्यक्ती आपल्या नोकरीच्या काळात कुटुंबीयांच्या सर्व आर्थिक गरजा भागवत असते. शास्त्रीय परिभाषेत या जबाबदारीची मोजदाद मानवी जीवन मूल्यामध्ये होत असते", बने सांगतात. "घरातल्या सर्वांच्या आर्थिक गरजा लक्षात घेतल्या तर अशा व्यक्तीचं जीवन मूल्य हे दीड-दोन कोटींच्या घरात जातं. आणि मिळकत

समभाग संलग्न बचत योजना (ELSS)

समभाग संलग्न बचत योजना (ELSS) या विशेष प्रकारच्या गुंतवणूक योजना असून त्या म्युच्युअल फंडाच्या पुरस्कार्त्यांकडून राबवण्यात येतात. या योजना निरंतर (Open Ended) किंवा बंदिस्त (Closed Ended) या दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहेत. यामध्ये एकरकमी किंवा जमेल तशी गुंतवणूक करता येते. त्याचप्रमाणे त्यात किमान ₹ ५००आणि कमाल कितीही रकमेची नियोजनपूर्वक गुंतवणूकही (SIP) करता येते. यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर ८०/C च्या विहित मर्यादेत सूट मिळते. लाभांश (Dividend) आणि मूल्यवृद्धी (Growth) हे दोन्ही पर्याय उपलब्ध असून या योजनेस लाभांश पुनर्गुंतवणूक (Dividend Reinvestment) हा पर्याय उपलब्ध नाही. या योजनेतील ८०% रक्कम ते अनुकरण करीत असलेल्या इंडेक्समधील वैविध्यपूर्ण (Diversified) अशा समभागात जसे S&P Nifty किंवा S&P Nifty ५०० या इंडेक्समधील समभाग आणि २०% रक्कम डेट, मनी मार्केटमध्ये गुंतवली जाते. (अधिक तपशिलासाठी योजनेचे मागणीपत्र पाहावे.) सध्या मान्यताप्राप्त निवृत्तीयोजनेची वर्गणी (PF, VPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC),सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), विमा हप्ते, गृहकर्ज परतफेड, शैक्षणिक

निवृत्तीवेतन (पेन्शन) योजना NPS

निवृत्तीवेतन (पेन्शन) योजना म्हणजे अशी योजना जी आपल्या निवृत्तीनंतर खात्रीने उत्पन्न, निश्चित कालावधीसाठी देण्याची हमी देते. या योजनेत सहभागी होऊन आपण योजनेचे हप्ते भरले असता, जमा रकमेत दीर्घ काळात वाढ होते. ह्या रकमेचे व्यवस्थापन करून धारकास दरमहा उत्पन्न मिळते. सर्वसाधारणपणे या वेळी मिळणाऱ्या उत्पन्नाचे मार्ग बंद झाल्याने या उत्पन्नातून अस्तित्वात असलेली जीवनशैली राखता येते. आपण कोणावरही अवलंबून नाही, या भावनेतून आत्मसन्मानात  भर पडते. अशा प्रकारच्या योजना जीवन विमा कंपन्या, म्युच्युअल फंड आणि सरकार यांच्याकडून राबवण्यात येतात. राष्ट्रीय सेवानिवृत्ती योजना ही सरकारी मान्यता असलेली सेवानिवृत्ती योजना असून १८ ते ६५ या वयोगटातील कोणत्याही भारतीय नागरिकांस या योजनेत ऐच्छीकरीत्या सहभागी होता येते, नंतर ऐच्छिकरित्या ७० वर्षापर्यंत ती चालू ठेवू शकता येते. तर १ जानेवारी २००४ नंतर रुजू झालेल्या केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना (सैन्य विभाग सोडून) या योजनेत सक्तीने सहभागी व्हावे लागते. पेन्शन वरील खर्चात बेसुमार वाढ झाल्याने सरकारी कामगारांना पूर्वीच्या निश्चित हमी पेन्शनऐवजी सहभागानु

आता तुमच्या हाॅस्पिटलचा खर्च आम्ही करणार !

विचारात पडलात ना. ? दररोजची वाढती महागाई , दररोज मशीनप्रमाणे धावपळीने होणारी दगदग , न परवडणारी औषधे व विविध तपासण्या , हाॅस्पिटलचा अमाप खर्च व या सर्व गोष्टींमुळे जीवनात वाढता तणाव....! तेव्हा या सर्व हॉस्पिटल खर्चाचा बोजा सोपवा आमच्यावर. कुटुंब आरोग्य विमा योजना कुटुंब आरोग्य विमा पॉलिसी परवडणार्‍या प्रिमिअमवर , इजा किंवा आजारासारखे परिणाम असू शकणार्‍या घटनेसाठी संपूर्ण कुटुंबाला कव्हर देते. कुटुंब आरोग्य विमा योजना हॉस्पिटलाइझेशन , उपचार , शस्त्रक्रिया , अंग प्रत्यारोपण इत्यादींसंबंधी खर्चांना समावेश असतो. कुटुंब आरोग्य विमा योजना तुम्ही , तुमचे पति/पत्नी आणि आश्रित आई-वडील आणि मुले ; भाऊ , बहीण , मेहूणा , मेहुणी , पुतणा , पुतणी आणि अन्य कोणतेही आश्रित किंवा सोबत राहणार्‍या संबंधींना कव्हर करते. कुटुंब आरोग्य विमा का निवडावा ? वाढती प्रदूषण पातळी , बदलत्या जीवनशैली सवयी , आरामदायक जगणें , खाद्य संक्रमण आणि अन्य अशा कारणांमुळे आपल्या आरोग्याला पूर्वीपेक्षा अधिक धोका आहे.सांगण्याची गरज नाही की , मागील दशकामध्ये आरोग्य समस्या व आजारांच्या संभावनांमध्ये आश्

गाडीचा विमा हे दुर्लक्ष महागात पडू शकते

वाहन विमा हा कार , ट्रक , मोटारसायकल व इतर वाहनांच्या संरक्षणासाठी काढलेला   विमा   होय. या विम्याचा प्राथमिक उद्देश हा रहदारीच्या अपघातांपासून होणारे वाहनाचे/वाहनांचे नुकसान व वाहनचालकाला वा अपघातात सापडल्याने इतर व्यक्तीला झालेल्या शारीरिक इजा यांपासून आर्थिक सुरक्षा पुरवणे हा आहे. वाहन विमा हा रहदारीच्या अपघातांमुळे निर्माण होणार्‍या अन्य काही दायित्वांपासूनही आर्थिक सुरक्षा पुरवतो. वाहन विम्याच्या विशिष्ट अटी या प्रत्येक विभागाच्या कायदेशीर तरतुदीनुसार बदलतात. काही प्रकारचे वाहन विमा हे रस्ते अपघातांव्यतिरिक्त कारणांमुळे होणारे वाहनाचे नुकसान व चोरी यांपासूनही आर्थिक सुरक्षा प्रदान करतात. गाडीचा विमा का करावा आजच्या जमान्यामध्ये महागड्या गाड्या वापरणार्‍यांची संख्या वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर रस्ते अपघातांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. रस्ते अपघातांमुळे होणारे वाहनाचे नुकसान व अपघातामध्ये समाविष्ट व्यक्तींच्या उपचाराचा खर्च यामुळे खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो. बर्‍याच वाहनधारकांना हा आर्थिक खर्च पेलणे कठीण असते. म्हणूनच वाहनधारकांसाठी ही एक चिंतेची बाब असते. बरेच लोकं या भी