Skip to main content

Posts

*।।न्यू इयर चालू होणे से पहले कुछ बाते वापस याद करना चाहता हूं ।।*

युवा निवेशक इन 6 तरीकों से करें बचत-निवेश, *नहीं होगी पैसे की कमी* आज के दौर में काफी कम उम्र में ही लोग कमाना शुरू कर देते हैं। लेकिन काफी वक्त के बाद भी उनके पास बचत के नाम पर कुछ नहीं होता है। आखिर इसके पीछे क्या कारण होते हैं कि हर महीने मोटी तनख्वाह के बावजूद वे बचत नहीं कर पाते हैं। दरअसल, *इन सब के पीछे फाइनेंसियल प्लानिंग का न होना जिम्मेदार है।* आजकल के दौर में कॉलेज की शिक्षा पूरी करते ही छात्रों को मिल जाती है नौकरी युवाओं के हाथ हर महीने आने लगती है तनख्वाह के रूप में अच्छी-खासी रकम युवा निवेशकों को शुरुआत से ही निवेश की ओर अपना ध्यान केंद्रित करना चाहिए निवेश से संबंधित कुछ टिप्स जानकर आप बेहतर तरीके से निवेश को अंजाम दे सकेंगे आजकल के दौर में कॉलेज की शिक्षा पूरी करते ही छात्रों को नौकरी मिल जाती है। 21-22 साल की उम्र से ही युवाओं के हाथ हर महीने SALARY के रूप में अच्छी-खासी रकम आने लगती है। *ऐसे में युवा निवेशकों को शुरुआत से ही INVESTMENT की ओर अपना ध्यान केंद्रित करना चाहिए*, ताकि बेहद कम समय में न सिर्फ वित्तीय लक्ष्यों को प्राप्त किया जा सके, *बल्कि एक अच्छा-खा

Rich Dad Poor Dad

जगप्रसिद्ध गुंतणूकदार आणि Rich Dad Poor Dad या त्यांच्या जगप्रसिद्ध गाजलेल्या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी म्हणतात "जगातील ९०% लोक ही रॅट रेसमध्ये अडकलेली असतात. म्हणजेच काय तर सकाळी उठणे कामाधंद्यास जाणे त्यातून कमावणे, खर्च करणे, देणी देणे, परत कमवणे खर्च करणे देणी देणे आणि हे दुष्टचक्र आयुष्यभर चालूच असते म्हणून ह्या व्यक्ती कधीच श्रीमंत होऊ शकत नाहीत" कारण ह्या व्यक्ती आपण कमावलेल्या पैशाचे कधीच संपत्तीत रूपांतर करत नाहीत जसे की -रिअल इस्टेट ज्यातून भाडे मिळू शकते किंवा किंमत वाढू शकते. - शेअर्स खरेदी करणे - व्यवसायात गुंतवणूक करणे फक्त आज कमावलेले आज खर्च करणे आणि उद्याची वाट बघणे हेच ते करत असतात आणि यात मूळ अभाव असतो आर्थिक शिक्षणाचा आणि कधीच ना केलेल्या आर्थिक नियोजनाचा. आपण प्रत्येकाने शाळेत असताना "जोड्या लावा" ह्या प्रकारांमध्ये भरघोस गुण मिळवले असतील इतका सोपा गुण मिळवून देणारा प्रकार होता. पण जेव्हा आज आपल्या जीवनात काही आर्थिक ध्येयं आहेत त्यांच्यासाठी आज आपण काय गुंतवणूक केली आहे अशा जोड्या लावायला सांगितल्या तर किती त्रासदायक होईल? कारण या पद्

मेडिक्लेम....एक अत्यावश्यक गरज

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपण सर्वच जण अगदी धावत आहोत पैश्यांसाठी, करीअरसाठी, टार्गेट साठी,  दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी...!         पण या सर्व व्यापात आपण स्वतःला च विसरून गेलो अाहोत. कुटुंबातील व्यक्तिंसोबत वेळ देणे, नियमीत पायी फिरायला जाणे, मैदानी खेळ खेळणे, पोहणे, सायकल चालविणे, निसर्गाच्या सान्निध्यात राहणे हे अगदी दुरापास्त झाल्यासारखे आहे. सतत कामाचा ताण, व्यायामाचा अभाव, सकस अाहाराचा अभाव, तेल व फास्ट फुड चा अति वापर, वाढत चाललेली व्यसनाधीनतेची फॅशन यावर आपल्या शरीरावर जो अन्याय होतोय तो आपण सोयीस्कर विसरतो . परिणामी आजकाल अगदी पस्तीशीच्या लोकांनाही ह्रदयविकार, अतिरक्तदाब, मधुमेह, दमा, लठ्ठपणा आदी समस्या उद्भवत आहेत. गतिमान आयुष्यात अधिक गतीने व पुरेशी सावधानता व वाहतूकीचे नियम न पाळता वाहने चालविणे वा आपण कितीही व्यवस्थित चाललो तरी  दुसरयांच्या चुकीमुळे अपघात हेही नित्याचेच झालेले आहेत. अशा एकंदरीत प्रतिकूलतेचा विचार केल्यास *आपल्याला केव्हा ना केव्हा तरी हाॅस्पीटलची पायरी चढावीच लागणार ही जाणीव प्रत्येकाला असलीच पाहिजे.*            आपण अनेकविध भौतिक सुखं व चैनीच्या वस्

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती देशातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमांकाच्या सरकारी बँकेमध्ये जो आर्थिक अपहार करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कार्यशैली बाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. देशातील जवळपास 60 टक्के बँकिंग क्षेत्र हे सार्वजनिक बँकांनी व्यापले आहे. देशातील खाजगी बँका विचार करता त्यांची कार्यक्षमता व आर्थिक प्रगती ही नेहमीच सार्वजनिक बँकांपेक्षा अधिक सक्षम राहिली आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शाखेत नीरव मोदी यांनी 11हजार 400 कोटीचा आर्थिक अपहार केल्याचे उघड झाले आहे. त्यासंबंधी सीबीआय चौकशी करीत आहेत व तसा प्राथमिक अहवाल त्यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आला आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. हा सर्व प्रकार मागील सात वर्षांपासून सुरु होता.याची खबर ना मध्यवर्ती बँकेला होती, ना वित्त मंत्रालयाला होती. हा आर्थिक अपहार करण्यासाठी नीरव मोदी यांनी लेटरऑफ अंडरटेकिंग (एलओयू) आधार घेतला. एलओयूच्या आधारावर विदेशातील विविध बॅंकांच्या शाखेतून पैसे काढण्यात आले व त्या

ग्रामीण भारताच्या सर्वसमावेश विकासासाठी अर्थसंकल्प

ग्रामीण भारताच्या सर्वसमावेश विकासासाठी २०१८-१९ चा अर्थसंकल्प:  डॉ.संतोष सूर्यवंशी   माननीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भाजप सरकारचा पाचवा अर्थसंकल्प सादर केला आहे. भाजप सरकारच्या वतीने सलग पाच वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अरुण जेटली हे पहिले अर्थमंत्री आहेत. अर्थसंकल्प सादर करत असताना जेटली यांनी समाजातील सर्व घटकांचा विचार केलेला दिसून येत आहे. त्यामध्ये त्यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला , तरुण,  शेतकरी,  महिला शेतकरी, ग्रामीण- शहरी असा कोणताही भेदभाव न करता देशातील सर्वसमावेशक विकासाची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प हा ग्रामीण भागाच्या आणि शेतीच्या विकासासाठी आहे. अर्थसंकल्पामध्ये शेती आणि ग्रामीण विकासासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. एकूण अर्थसंकल्पाच्या 13.34 लाख कोटी रुपये या क्षेत्रासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. अर्थसंकल्पामध्ये मागील काही वर्षापासून देशातील शेतकऱ्यांनी व शेतकरी संघटनांनी सातत्याने किमान आधारभूत किमती ह्या उत्पादन खर्चाच्या दीडपट असाव्यात अशी मागणी