Skip to main content

Posts

Showing posts from 2018

ह्या सहा विमा कवचांकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला महागात पडेल

धोका सगळीकडे असतो. आपण सगळेच रोजच्या आयुष्यात विचार करून धोका पत्करतो. मात्र, आपल्यापैकी बहुतांश लोकांचे आयुष्य, संपत्ती, आणि लक्ष या बाबतीत धोका पत्करणे होत नाही. आरोग्य, संपत्ती आणि आयुष्याला होऊ शकणार्‍या आकस्मिक धोक्यापसून संरक्षण करण्यासाठी आपल्याला विचार करून धोका पत्करावा लागतो. आणि ह्याचे सर्वोत्तम व्यवस्थापन उपकरण म्हणजे विमा. आता आपण आयुष्यातले मुख्य धोके कुठले ते बघू आणि त्याचे व्यवस्थापन योग्य विमा कवचा द्वारे कसे करावे ते बघू. धोका: वाढते वैद्यकीय खर्च धोक्याचे व्यवस्थापन: आरोग्य विम्या द्वारे आर्थिक नियोजनात पहिल्या काही पावलांमध्ये वैद्यकीय खर्चापासून संरक्षण करणे समाविष्ट असते. परिवारात कुणालाही कधीही आजारपणामुळे, अपघातामुळे किंवा गंभीर आजारमुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागू शकते. मानसिक त्रासासकट परिवाराला रुग्णालयाचे पैसे भरण्यासाठी प्रचंड आर्थिक ताणाला सामोरे जावे लागते. अशा वेळी वैद्यकीय खर्चासाठी आरोग्य विमा योजना हे उत्तर असू शकते. आरोग्य विमा योजना नसेल तर कदाचित आपल्या बचतीतून पैसे द्यावे लागतील, ज्यामुळे दीर्घावधी लक्ष धोक्यात येऊ शकते किंवा कदाचित आपल्या मित्

म्युच्युअल फंड

आपल्या गुंतवणूकीवर सरस परतावा मिळवण्यासाठी म्युच्युअल फंड हा एक पर्याय असू शकेल. गुंतवणूक करताना नेहमी, गुंतवणूक करणा-या व्यक्तीची जोखिम घेण्याची क्षमता, वय, गुंतवणूकीची रक्कम व सातत्य, त्याची इतर आर्थिक जबाबदारी, गुंतवणूकीचा कालावधी व गुंतवणूकदाराचे आर्थिक उद्दिष्ट (Financial Goals) या सगळ्याच गोष्टी विचारात घ्याव्या लागतात आणि या सर्व निकलातून पारखून सरस परतावा देणारा एक पर्याय म्हणजे म्युच्युल फंड. शेअर बाजारातील थेट गुंतवणूक जरी गुंतवणूकदारास आकर्षित करीत असली तरी त्यासाठी आवश्यक असे भांडवल, दयावा लागणारा वेळ व तांत्रिक ज्ञान, योग्य मार्गदर्शनाचा अभाव, शेअर बाजाराचा अभ्यास व जागतिक घडामोडींचा शेअर बाजारावरील परिणामाचा अभ्यास, भीती व लोभ या वरील नियंत्रण, शिस्तबध्दता या सर्व गोष्टी एकत्र जुळून येण्याचा अभाव असल्याने तुलनेने सोपी अशी गुंतवणूक म्युच्युअल फंडात करता येईल. यात जोखीम ही तुलनेने कमी आहे व कमी रकमेतून ही गुंतवणूक करता येईल. कर बचतीचे उद्दीष्ट साध्य करता येईल. अडीअडचणीच्या वेळी गुंतवलेल्या पैश्याची त्वरीत उपलब्धता ही सोयही म्युच्युअल फंडाचा एक पैलू आहे. जितक्या लवकर व

म्युच्युअल फंड गुंतवणूकीचे फायदे

१)म्युच्युअल फंड हे गुंतवणूकीचे प्रभावी माध्यम आहे. २) प्रत्येकाच्या गरजेनुसार म्युच्युअल फंडाच्या विविध योजना गुंतवणूकीसाठी उपलब्ध असतात. ३)म्युच्युअल फंडात जास्त जोखमीच्या तसेच जवळपास अजिबात जोखीम नसणा-याही योजना असतात. ४)म्युच्युअल फंडाच्या कर बचतीच्याही योजना असून यातून आयकर कलम ८०-सी अंतर्गत सुट मिळते. ५)म्युच्युअल फंडाच्या इक्वीटी योजनेत केलेल्या गुंतवणूकीवर एक वर्षानंतर मिळणारा सर्व फायदा (As per LTCG New Rule)  असतो. ६)म्युच्युअल फंडाच्या डेब्ट योजनेत केलेल्या गुंतवणूकीवर एक वर्षानंतर मिळणा-या उत्पन्नावर इंडेक्ससेशनचा फायदा घेऊन कर बचत करता येते. ७) म्युच्युअल फंडात दिर्घकाळासाठी नियमीत दरमहा गुंतवणूक केली असता फार चांगला फायदा मिळण्याची शक्यता असते. ८)तज्ञ व्यक्ती तुमच्या गुंतवणूकीची काळजी घेतात. ९) शेअर बाजारातील दिर्घकालीन वाढीचा फायदा मिळतो. १०)नियमीत बचतीची सवय लागते. ११) भविष्यातील आर्थीक गरजा भागवल्या जातात. १२) संपत्ती निर्माण होते. १३) तुमच्या गुंतवणूकीचा तपशील केव्हाही ऑनलाईन पहाता येतो. १४) केव्हाही पैसे काढण्याची सुवीधा असल्यामुळे गरजेला केव्हाही पैसे म

*।।न्यू इयर चालू होणे से पहले कुछ बाते वापस याद करना चाहता हूं ।।*

युवा निवेशक इन 6 तरीकों से करें बचत-निवेश, *नहीं होगी पैसे की कमी* आज के दौर में काफी कम उम्र में ही लोग कमाना शुरू कर देते हैं। लेकिन काफी वक्त के बाद भी उनके पास बचत के नाम पर कुछ नहीं होता है। आखिर इसके पीछे क्या कारण होते हैं कि हर महीने मोटी तनख्वाह के बावजूद वे बचत नहीं कर पाते हैं। दरअसल, *इन सब के पीछे फाइनेंसियल प्लानिंग का न होना जिम्मेदार है।* आजकल के दौर में कॉलेज की शिक्षा पूरी करते ही छात्रों को मिल जाती है नौकरी युवाओं के हाथ हर महीने आने लगती है तनख्वाह के रूप में अच्छी-खासी रकम युवा निवेशकों को शुरुआत से ही निवेश की ओर अपना ध्यान केंद्रित करना चाहिए निवेश से संबंधित कुछ टिप्स जानकर आप बेहतर तरीके से निवेश को अंजाम दे सकेंगे आजकल के दौर में कॉलेज की शिक्षा पूरी करते ही छात्रों को नौकरी मिल जाती है। 21-22 साल की उम्र से ही युवाओं के हाथ हर महीने SALARY के रूप में अच्छी-खासी रकम आने लगती है। *ऐसे में युवा निवेशकों को शुरुआत से ही INVESTMENT की ओर अपना ध्यान केंद्रित करना चाहिए*, ताकि बेहद कम समय में न सिर्फ वित्तीय लक्ष्यों को प्राप्त किया जा सके, *बल्कि एक अच्छा-खा

Rich Dad Poor Dad

जगप्रसिद्ध गुंतणूकदार आणि Rich Dad Poor Dad या त्यांच्या जगप्रसिद्ध गाजलेल्या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी म्हणतात "जगातील ९०% लोक ही रॅट रेसमध्ये अडकलेली असतात. म्हणजेच काय तर सकाळी उठणे कामाधंद्यास जाणे त्यातून कमावणे, खर्च करणे, देणी देणे, परत कमवणे खर्च करणे देणी देणे आणि हे दुष्टचक्र आयुष्यभर चालूच असते म्हणून ह्या व्यक्ती कधीच श्रीमंत होऊ शकत नाहीत" कारण ह्या व्यक्ती आपण कमावलेल्या पैशाचे कधीच संपत्तीत रूपांतर करत नाहीत जसे की -रिअल इस्टेट ज्यातून भाडे मिळू शकते किंवा किंमत वाढू शकते. - शेअर्स खरेदी करणे - व्यवसायात गुंतवणूक करणे फक्त आज कमावलेले आज खर्च करणे आणि उद्याची वाट बघणे हेच ते करत असतात आणि यात मूळ अभाव असतो आर्थिक शिक्षणाचा आणि कधीच ना केलेल्या आर्थिक नियोजनाचा. आपण प्रत्येकाने शाळेत असताना "जोड्या लावा" ह्या प्रकारांमध्ये भरघोस गुण मिळवले असतील इतका सोपा गुण मिळवून देणारा प्रकार होता. पण जेव्हा आज आपल्या जीवनात काही आर्थिक ध्येयं आहेत त्यांच्यासाठी आज आपण काय गुंतवणूक केली आहे अशा जोड्या लावायला सांगितल्या तर किती त्रासदायक होईल? कारण या पद्

मेडिक्लेम....एक अत्यावश्यक गरज

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपण सर्वच जण अगदी धावत आहोत पैश्यांसाठी, करीअरसाठी, टार्गेट साठी,  दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी...!         पण या सर्व व्यापात आपण स्वतःला च विसरून गेलो अाहोत. कुटुंबातील व्यक्तिंसोबत वेळ देणे, नियमीत पायी फिरायला जाणे, मैदानी खेळ खेळणे, पोहणे, सायकल चालविणे, निसर्गाच्या सान्निध्यात राहणे हे अगदी दुरापास्त झाल्यासारखे आहे. सतत कामाचा ताण, व्यायामाचा अभाव, सकस अाहाराचा अभाव, तेल व फास्ट फुड चा अति वापर, वाढत चाललेली व्यसनाधीनतेची फॅशन यावर आपल्या शरीरावर जो अन्याय होतोय तो आपण सोयीस्कर विसरतो . परिणामी आजकाल अगदी पस्तीशीच्या लोकांनाही ह्रदयविकार, अतिरक्तदाब, मधुमेह, दमा, लठ्ठपणा आदी समस्या उद्भवत आहेत. गतिमान आयुष्यात अधिक गतीने व पुरेशी सावधानता व वाहतूकीचे नियम न पाळता वाहने चालविणे वा आपण कितीही व्यवस्थित चाललो तरी  दुसरयांच्या चुकीमुळे अपघात हेही नित्याचेच झालेले आहेत. अशा एकंदरीत प्रतिकूलतेचा विचार केल्यास *आपल्याला केव्हा ना केव्हा तरी हाॅस्पीटलची पायरी चढावीच लागणार ही जाणीव प्रत्येकाला असलीच पाहिजे.*            आपण अनेकविध भौतिक सुखं व चैनीच्या वस्