Skip to main content

Posts

राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना

अर्थव्यवस्थेत शेअर बाजाराचे महत्त्व मोठे आहे. उद्योगांना भांडवल उभारणी करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी व ती मोकळी करण्यासाठी शेअर बाजार सहाय्यभूत होतो. भारतात १८७५ मध्ये मुंबई शेअर बाजार सुरू झाला. १९९० पर्यंत देशात साधारण २३ शेअर बाजार कार्यरत होते. ते प्रामुख्याने क्षेत्रीय स्तरावर कार्यरत होते. या सर्व बाजारातील एकूण व्यवहारांपैकी सुमारे ८० टक्के व्यवहार मुंबई बाजारात होत असत आणि तो देशात सर्वांत मोठा बाजार होता. त्याला अन्य बाजारांची फारशी स्पर्धा नव्हती. मोजके आणि एकमेकांशी खूपच जवळीक असलेले व्यापारी तेथे ब्रोकर्स म्हणून काम करत. मुंबई, दिल्ली, कलकत्ता, अहमदाबाद आणि मद्रास या शेअर बाजाराच्या नियामक मंडळात ब्रोकर्सची संख्या अनुक्रमे ६७, ७१, ६८, ६३ आणि ६० टक्के इतकी होती. यावरून बाजारात ब्रोकर्सचा प्रभाव सहज लक्षात येईल. कार्यकारी संचालकावर ब्रोकर्सचा खूप दबाव राहत असे. बाजाराच्या कारभारात पारदर्शकता नव्हती. तंत्रज्ञानाचा वापर नव्हता. खरेदी-विक्रीचे व्यवहार बाजाराच्या हौद्यात ब्रोकर्सच्या आवाजी देवाणघेवाणीतून होत असत. काँट्रॅक्ट नोटवर व्यवहारांची वेळ नोंदलेली नसल

मुंबई शेअरबाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअरबाजार (NSE)

 मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअरबाजार (NSE) हे भारतातील दोन प्रमुख शेअर बाजार असून जवळजवळ सर्वच  शेअर, रोखे किंवा कर्जरोखे यांचे व्यवहार या दोनपैकी कोणत्यातरी एका बाजारात होतात. हे दोन्ही बाजार मुंबईतच आहेत. यातील मुंबई शेअरबाजार हा आशियातील सर्वात जुना शेअरबाजार आहे, त्याची स्थापना 1875 साली झाली. तर राष्ट्रीय शेअरबाजाराची स्थापना 1992 साली झाली. सध्या दोन्ही शेअरबाजारात 100% व्यवहार संगणकामार्फत होतात. या दोन्ही बाजारातील साम्य आणि फरक खालीलप्रमाणे--   *मुंबई शेअर बाजारातील विविध क्षेत्रातील 30 प्रमुख कंपन्यांच्या व्यवहारास उपलब्ध समभागांच्या उलाढाल आणि बाजारमूल्य यावर आधारित निर्देशांक असून त्यास सेन्सेक्स असे म्हणतात तर अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअरबाजारातील 50 कंपन्या असलेल्या निर्देशांकास निफ्टी असे म्हणतात. *मुंबई शेअरबाजार हा जगातील सर्वात मोठा असा 10 वा शेअरबाजार असून राष्ट्रीय शेअरबाजार 11 व्या स्थानी आहे. *मुंबई शेअरबाजाराचे 30 नोव्हेंबर 2018 रोजीचे बाजारमूल्य 205600 अमेरिकन डॉलर होते तर राष्ट्रीय शेअरबाजाराचे त्याच दिवशीचे बाजारमूल्य 203000 कोटी अमेरिकन डॉल

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगली कंपनी कशी निवडावी

 ज्या कंपनीचे उत्पादन सुरळीत चालू आहे दरवर्षी विक्रीचा आकडा मागच्या वर्षापेक्षा किमान दहा ते बारा टक्क्यांनी जास्त असावा  विक्रीवरील नफ्याचे प्रमाण मागच्या वर्षी पेक्षा जास्त असावे  उलाढालीच्या प्रमाणात गंगाजळी समाधानकारक असावी  सर्व देण्याचे आणी घेण्याचे व्यवहार मिटवता उलाढालीचा प्रमाणात कंपनीचे निव्वळ मूल्य समाधानकारक असावे कंपनीचे उत्पादन आधुनिक काळाशी सुसंगत असावे  उत्पादनासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला असावा व व उत्पादनात आणखी सुधारणा घडवून आणण्यासाठी जी कंपनी संशोधनावर पुरेसा खर्च करते अशी कंपनी निवडावी  कंपनीचे संचालक व व्यवस्थापक मंडळ निष्कलंक असावे कंपनीच्या हाती मोठ्या प्रमाणात पेंडिंग ऑर्डर्स असाव्यात त्याचबरोबर पेंटिंग ऑर्डर्स पूर्ण करण्याची कंपनीची क्षमता असावी कंपनीच्या भावी विस्ताराची दिशा आणि योजना तयार आहेत का हेदेखील बघणे आवश्यक आहे.  कंपनीचा कारभार किती वर्षापासून सुरू आहे कंपनी व संचालकांना गरज व्यवहाराबद्दल कधी दंड झाला आहे का  कंपनीचे कामगारांची संबंध सुरळीत आहेत का  कंपनी नियमीत डिव्हिडंड देते का  कंपनी बोनस देत

चांगले शेयर्स कसे निवडावे

चांगले समभाग शोधण्याची साधन  विविध गुणोत्तरे  (Financial Ratios) इफिशियन्सि रेशो : कार्यक्षमतेच्या या रेशोमुळे कंपनी आपली मालमत्ता , भागभांडवल , घेतलेली कर्जे यांचा पूर्ण क्षमतेने वापर करून किमान खर्चात कमाल उत्पादन करते का ?ते समजण्यासाठी मदत होते . १.वर्किंग कॅपिटल टर्नओवर रेशो :निव्वळ उलाढालिस वर्किंग कॅपिटल म्हणजेच चालू मालमत्तेमधून चालू देयता (liabilities) वजा करून आलेल्या संख्येने भागले तर हा रेशो मिळतो .हा रेशो जेवढा जास्त तेवढे चांगले . २.रिसिव्हेबल टर्नओवर :या मध्ये निव्वळ उलाढालिस येणे बाकी असलेल्या रकमेने भागले जाते .येणे रक्कम जेवढी कमी तितका भागाकार वाढेल .हा रेशो काळजीपूर्वक काढणे जरुरीचे आहे . ३.इनव्हेटरी टर्नओवर रेशो :उत्पादनातील कच्चा माल , अर्धवट प्रक्रिया झालेला माल आणि उत्पादित परंतु शिल्लक माल यास इनव्हेटरी असे म्हणतात त्यांस विक्री झालेल्या उत्पादित मालास आलेल्या खर्चाने हा रेशो मिळतो .हा रेशो खूपच फसवा असून इनव्हेटरी कमीत कमी असणे त्याचबरोबर उत्पादन खर्च कमी असणे हे चांगल्या कंपनीचे लक्षण आहे . ४.प्राईज अर्निग रेशो :PE या संक्षिप्त नावाने प्

मुंबईला सर्वात मोठा धोका! संपूर्ण शहर जाणार पाण्याखाली, सॅटेलाइट फोटो आले समोर

मुंबई शहराला आतापर्यंतचा सर्वात मोठा धोका, पहिल्यांदाच आले फोटो समोर. नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर :  समुद्रातील पाण्याचा पातळी दिवसेंदिवस वाढत असल्यामुळं जगभरातील बरेच देश संकटात आहेत. हा पाण्याची पातळी सतत वाढत असल्यामुळं 2050 पर्यंत जगभरातील अनेक शहरांवर याचा विपरीत परिणाम होणार आहे. दरम्यान नुकत्याच एका रिचर्समध्ये याबाबत अभ्यास करण्यात आला. त्यानुसार, पाण्याची पातळी वाढल्यामुळं जगभरातील 15 कोटी लोकांना याचा फटका बसणार आहे. काही वर्षांनंतर या 15 कोटी लोकांकडे राहण्याची सोयही नसणार आहे. या रिचर्सनुसार समुद्रातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळं मुंबई शहर पूर्णपणे नष्ट होऊ शकते, असा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. या रिचर्समध्ये शास्त्रज्ञांनी सॅटेलाइटमधून आलेल्या फोटोंवरून हा निकष काढला आहे. न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या बातमीनुसार, सॅटेलाइटच्या मदतीनं समुद्रातील पाण्याच्या पातळीची गणना करण्यात आली आहे. यावरून ही पातळी वाढत असल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे. हा रिसर्च प्रतिष्ठित जर्नल नेचर कम्युनिकेशननं प्रकाशित केला आहे. Free Demat Account संपूर्ण मुंबई जाणार पाण्याखाली