भारतातील अर्थसाक्षरतेबद्धल एका संस्थेने केलेल्या पाहणीचे निष्कर्ष नुकतेच वाचण्यात आले. त्यातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे :- १) बहुतेक लोक FD आणि Insurance (Money back) यांना गुंतवणूक समजतात. २) सोन्याचे दागिने व राहते घर यांचे सध्याचे बाजारमूल्य कितीही जास्त असले तरी ते आभासी आहे. त्याचा फारसा काही उपयोग नसून त्याने फक्त मानसिक समाधानच लाभू शकते. ३) महागाईवर मात करणारा परतावा मिळाला पाहिजे हे अनेकांना माहित नाही. ४) म्युच्युअल फंड हा विमा प्रकार असून SIP ही पॉलिसी आहे असे अनेकांना वाटते. ५) आपल्याकडे किती रकमेची, कोणत्या कंपनीची आणि किती वर्षाची विमा पॉलिसी आहे, तसेच कोणत्या म्युच्युअल फंडामध्ये आपली किती रक्कम आहे हे अनेकांना अंदाजेही सांगता येत नाही. आपल्या विमा रकमेवर मिळत असणारा परतावा ६% पेक्षाही कमी आहे हे अनेकांना माहित नाही. ६) फारच थोड्या लोकांनी योग्य रकमेचा, योग्य मुदतीचा आणि योग्य वर्षांचा मुदत विमा (Term Insurance) व आरोग्यविमा (Mediclaim) घेतला आहे. यामध्ये भरत असलेल्या हप्त्यांचा उपयोग न होण्यातच आपला खराखुरा फायदा आहे, हे त्यांच्या लक्षातच येत नाही. ७) अनेक लोक भव